मुख्यमंत्र्यांनी बापटांवर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा

मुख्यमंत्र्यांनी बापटांवर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा

पुणे : अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरिश बापट यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपचे खासदार संजय काकडे यांनी समाचार घेत, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.

डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या वार्षिक कार्यक्रमात बापटांनी पुढे आपले सरकार येईल की नाही असे वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर खा. संजय काकडे यांनी बापट यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. बापट यांनी आमचे सरकार येणार नाही हे कोणत्या आधारावर म्हटले माहित नाही. याचा त्यांच्याकडे काही अभ्यास आहे का याचीही माहिती नाही.मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने विकासाची कामे करत आहेत ते पाहता पुढील सरकार आमचेच असेल असा विश्वास व्यक्त केला. सध्याचे आमचे सरकार स्थिर असून, सरकारलाही कोणताही धोका नाही. शिवसेना व भाजपचे संबंध बिघडले नाहीत. आगामी निवडणूकीत शिवसेना-भाजप एकत्रच असेल. त्यावेळी भाजपाला १७० ते १८५ जागा मिळतील असा दावाही असे खा. संजय काकडे केला.

Previous articleगिरिश बापट हे वास्तवाची जाण असणारे नेते
Next articleभिडेंच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here