दलित समाजावर सुरू असलेली अन्यायी कारवाई तात्काळ थांबवा

दलित समाजावर सुरू असलेली अन्यायी कारवाई तात्काळ थांबवा

काॅग्रेसची मागणी

मुंबई : भीमा कोरेगावच्या घटनेनंतर पोलिसांकडून कोंबिग ऑपरेशन सुरु असून अनेक तरूण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी, रात्री अपरात्री घरात घुसून अटक करण्यात येत आहे. आतापर्यंत विविध ठिकाणाहून दलित समाजाच्या हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे मात्र मोकाट आहेत. मनुवादी विचारधारेच्या सरकारच्या इशा-यावर पोलीस कारवाई करत आहेत अशी भावना दलित समाजात निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या कारवाईचा आणि अटकसत्राचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करित असून सदर अन्यायी कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे

Previous articleविद्युत सुरक्षा सप्ताहाचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here