सर्वसामान्यांचे पाणी महाग झाले
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाने गठित केलेल्या महराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ग्रामपंचायतींपासून ते महापालिकांपर्यंतच्या पाणीपट्टीचे नवीन दर निश्चित केले असून, २०१० नंतर तब्बल सात वर्षांनंतर पाणीदरामध्ये वाढ करण्यात आली आहे. यानुसार हजार लिटरमागे ग्रामपंचायतींना १३.२पैशांवरून १५ पैसे, नगरपालिकांसाठी १५.८ पैशांवरून १८ पैसे, महापालिकांसाठी २१ पैशावरून २५ पैसे तर टाऊनशिपसाठी २१ पैशांवरून १.२५ रुपये इतकी दरवाढ करण्यात आली आहे. मिनरल वॉटर, शीतपेये, बीअर उत्पादक उद्योगांसाठी सर्वाधिक १६ रुपयांवरून १२० रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.