सरकार म्हणजे बश्या बैल, यांना रुमण्याचा हिसका दाखवावाच

सरकार म्हणजे बश्या बैल, यांना रुमण्याचा हिसका दाखवावाच

अजित पवार

नांदेड ( उमरी ) : शेतकऱ्यांशी आणि शेतीशी या सरकारचा काहीच संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी जनतेला केले. पक्षाच्या हल्लाबोल आंदोलना निमित्ताने आयोजित केलेल्या उमरी येथील सभेला संबोधीत करताना ते बोलत होते.

अजित पवार यांच्या भाषणाआधी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टिका केली. मुंडे म्हणाले की मुख्यमंत्री जरी म्हटले की ते शेतकरी आहेत तरी ते कोणत्याही बाजूने शेतकरी दिसत नाही. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत अजितदादा पवार म्हणाले की, या सरकारमधील लोकांना गाय, बैल, रेडकू यातला फरक कळत नाही. यांना शेतीतले काहीच समजत नाही तेव्हा या सरकारला वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा हिसका दाखवाच

Previous articleसरकारचा पायगुणच चांगला नाही राज्यात नुसत्या अळयाच अळया
Next article२०१९ हे वर्ष काँग्रेसचे, भाजपच्या घरवापसीचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here