भाजपची मस्ती उतरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

भाजपची मस्ती उतरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

खासदार राजू शेट्टी यांचा घणाघात

कृषीराज्यमंत्री खोतांच्या डोळ्यावर हिरवा गॉगल असल्यानेच सगळीकडे हिरवेगारपणा दिसत असल्याची टीका

लातूर  : गारपिटीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांचे पोस्टमार्टेम केल्याशिवाय मदत मिळणार नाही असे सांगितल्याने शेतक-यांची मृत जनावरे तीन दिवसांपासून गावात घरासमोर गोठ्यात पडलेली आहेत, त्यांचे अद्याप पोस्टमार्टम झालेले नाही, इतकी भयावह परिस्थिती या सरकारनं निर्माण केलीय, राज्यातल्या बळीराजाला त्रास देणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी तंबी खासदार राजू शेट्टी यांनी दिलीय. ते लातूरमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होते. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यावर २०१४ साली विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातील आरणी तालुक्यातील दाभडी गावात शेतकऱ्यांसोबत “चाय पे चर्चा” करत एकही आत्महत्या होणार नसल्याची ग्वाही पंतप्रधांनांनी दिली होती. मात्र त्यांची पाठ,फिरताचं
आज त्या गावांत शेतकऱ्यांच्या डझनभर आत्महत्या झाल्या आहेत. त्यानंतर मोदीच नाही तर साधा भाजपचा लोकप्रतिनिधीही फिरकला नाही, इतकं सरकार फसवेगिरी करणारं आहे. आता म्हणे पंतप्रधान शेतीक्षेत्रातल्या तज्ञांना घेऊन समस्या सोडवण्यासाठी “खेती पर चर्चा” असा उपक्रम राबवणार असल्याची चर्चा आहे, आता हे पाऊल म्हणजे लबाडीचा पुढचा टप्पा असल्याचंही खासदार शेट्टी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना म्हणाले. राज्यातील शेतकरी संघटनांचे विभाजनामुळे तुकडे झाले आहेत, त्यामुळे निदान शेतकऱ्यांना चांगला संघर्ष करणारा शेतकरी नेता तरी निवडायला वाव मिळतोय ना? असं शेट्टी म्हणाले.

गारपिटीमुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.सरकारनं तातडीनं शेतकर्‍यांना तातडीने व भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. बागायती पिकांसांठी एकरी २५ हजार आणि जिरायती पिकांसांठी एकरी १५ हजार तातडीनं द्यावी आणि अजून काही भागात पंचनामे सुरु नसल्याच्या तक्रारी येतायत, तिकडेही सरकारनं लक्ष द्यावे, असं शेट्टी म्हणाले.
कृषीराज्यमंत्री खोत यांनी डोळ्यावर हिरवा गॉगल घातल्यानं त्यांनी सगळीकडे आनंदीआनंद आणि शेतीमाध्ये हिरवेगारपणा दिसत असल्याची टीकाही त्यांनी नाव न घेता केली.भाजपच्या मंत्र्यांना झोडपून काढल्याशिवाया हे सरकार वठणीवर येणार नाही, असा इशाराही खासदार शेट्टी यांनी दिला.

Previous articleशिक्षण मंत्र्यांचा खुलासा वस्तुस्थितीशी विसंगत!
Next articleसरपंच हाच पंचायत राज व्यवस्थेच्या विकासाचा पाया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here