अधिवेशनात सरकारला घेरण्याची काॅग्रेसची रणनीती

अधिवेशनात सरकारला घेरण्याची काॅग्रेसची रणनीती

मुंबई : आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधीमंडळ समन्वय समितीची आज दुपारी विधानभवनातील काँग्रेस विधीमंडळ पक्ष कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते आ. शरद रणपिसे, प्रतोद आ. संजय दत्त, आ. नसीम खान, आ. वर्षा गायकवाड, आ. भाई जगताप, आ.प्रा. वीरेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत रणनीतीवर चर्चा झाली. राज्यातील ज्वलंत समस्या, अधिवेशनातील संभाव्य मुद्दे व चर्चेचा प्राधान्यक्रम, तसेच विविध आघाड्यांवर सरकारचे अपयश आदींबाबतही यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

फसवी कर्जमाफी, बोंडअळी व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानाची अद्याप भरपाई न मिळणे, हमीभाव, नुकतीच झालेली गारपीट, मुंबई व राज्याच्या अन्य शहरी भागातील वाढत्या समस्या, भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी, सरकारकडून सातत्यान होणारे इव्हेंट आदींसह इतर अनेक विषय या अधिवेशनात लावून धरण्याच्या सूचना या बैठकीत मांडण्यात आल्या.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सर्व विरोधी पक्षातील गटनेत्यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक असून, त्यामध्ये सरकारविरोधातील रणनितीवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल.

Previous articleतुम्हाला आमचे शेतकरी चोर वाटतात काय ?
Next articleगारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here