श्रीदेवी यांचे पार्थिव उद्या मुंबईत आणणार

श्रीदेवी यांचे पार्थिव उद्या मुंबईत आणणार

मुंबई : शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणी अहवालावर कायदेशीर प्रक्रिया आज पूर्ण होऊ शकली नसल्याकारणाने प्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव उद्या सोमवारी मुंबईत आणले जाणार आहे.

श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणल्यानतंर उद्या अंत्यसंस्कार होईल. शनिवारी मध्यरात्री श्रीदेवी यांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे दुबईत निधन झाले. आज
त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाणार याचीही चर्चा होती. आज रविवारी रात्री उशिरा श्रीदेवी यांचे पार्थिव चार्टर्ड विमानाने मुंबईत आणले जाईल असेही सांगण्यात येत होते. पण त्यांच्या शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणी अहवालावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचे पार्थिव उद्या मुंबईत आणले जाईल. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

Previous articleअर्थसंकल्पीय अधिवेशनात १६ विधेयके मांडणार
Next articleप्रत्येक मंत्र्याला शेतकर्‍यांचा आक्रोश सहन करावा लागेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here