बंदच्या काळात मुख्यमंत्री कोठे होते हे महाराष्ट्राला कळायला हवे !

बंदच्या काळात मुख्यमंत्री कोठे होते हे महाराष्ट्राला कळायला हवे !

सामनातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : एरवी सर्वच प्रकरणांत मुख्यमंत्री फडणवीस हे ‘सब कुछ मैं’च्या भूमिकेत असतात. मात्र राज्यातील विविध भागात मराठा आरक्षणावरून उद्रेक झाला असताना ते गेल्या चोवीस तासांत ते कोठे होते? त्यांच्या सरकारने या काळात पलायन का केले, हे महाराष्ट्राला कळायला हवे अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस नेहमीच ‘सब कुछ मै’च्या भूमिकेत असतात. मात्र, मागील चोवीस तासांत ते काय करत होते ते माहीत नाही. मराठा आरक्षणावरून उसळलेल्या दंगलीचे व पेटलेल्या महाराष्ट्राचे श्रेयदेखील आता घ्यायला हवे, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. वाटल्यास ‘आम्ही आरक्षण दिले होते’ असा डांगोरा पिटून त्याचेही श्रेय घ्या. पण महाराष्ट्राची आग शांत करा, असा टोलाही लगावण्यात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता मराठा आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. परळीमध्ये गेल्या आठवडाभरापासून मराठा आंदोलक आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निवेदन काढले असते तर ना महाराष्ट्र पेटला असता, ना काकासाहेब शिंदेंचे बलिदान झाले असते ना नंतरचा आगडोंब उसळला असता असेही अग्रलेखात म्हटले आहे.

Previous articleशिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा
Next articleमुख्यमंत्री बदलाल तर सरकारचा पाठिंबा काढू !