“एक महाकाव्य संपले”….राज ठाकरेंची आदरांजली

“एक महाकाव्य संपले”….राज ठाकरेंची आदरांजली

मुंबई : “एक महाकाव्य संपले” असा मथळा लिहित मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना रेखाचित्राच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेखाचित्रातून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी हे रेखाचित्र आपल्या फेसबुकवर पोस्ट केले आहे. मेरे प्यारे भारतवासीयो! आपका नम्र अटलबिहारी वाजपेयी असे एका कागदावर लिहिताना दाखवले आहे. तर त्याच्या बाजूला” एक महाकाव्य संपले” असा मथळा लिहित राज ठाकरे यांनी आपल्या भावना रेखाचित्राच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

Previous articleपुढच्या स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावर होणारं भाषण तुमच्या-माझ्या मनातील माणसंच !
Next articleकेरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटींचे अर्थसहाय्य