तो अहवाल पाहून छप्पन इंची छातीत धस्स तर झालं नाही ना? – धनंजय मुंडे

मुंबई नगरी टीम

सोलापूर : राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या (एनएसएसओ) वर्ष २०१७-१८ च्या रोजगार आणि बेरोजगारीचे वार्षिक सर्वेक्षण रोखल्याचा विरोध करत राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या (एनएससी) प्रभारी प्रमुखांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या एका सहकाऱ्यानेही पद सोडले आहे. याच प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.अहवाल पाहून छप्पन इंची छातीत धस्स तर झालं नसेल ना?’, असा सवाल मुंडे यांनी ट्विटवरुन केला आहे.

सांख्यिकीतज्ज्ञ पी. सी. मोहनन आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक जे व्ही मीनाक्षी यांना जून २०१७ मध्ये एनएससीच्या सदस्यपदी नियुक्त केले होते. दोघांनाही तीन वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला होता. एनएसएसओच्या अहवालाला उशीर होत असल्यामुळे दोघांनी कार्यकाळ पुर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे. याच राजीनाम्यांवरून धनंजय मुंडेंनी आज ट्विटवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हा अहवाला मोदींनी का रोखला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्या ट्विटमध्ये मुंडे म्हणतात, ‘वर्षाला २ कोटी रोजगार देणार असे छातीठोकपणे सांगणाऱ्या मोदींनी रोजगार अहवाल का रोखला?  नोकरीच्या संधी घटल्याचे पाहून छप्पन इंची छातीत धस्स तर झालं नसेल ना? मोदीजी तुम्ही किती दडपशाही करणार?’ तसेच पुढे ट्विटमध्ये त्यांनी ‘कोंबडं कितीही झाकलं तरी ते आरवल्याशिवाय राहत नाही. असा टोलाही मोदींनी लगावला आहे.

दरम्यान राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेमार्फत प्रसिद्ध होणारा हा मोदी सरकारचा पहिला अहवाल होता. नोटाबंदीनंतर नोकरीच्या संधी कमी झाल्याची आकडेवारी या अहवालात समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.कॉंग्रेसला प्रकाश आंबेडकर कोणत्याही परिस्थितीत आघाडीत आलेले पाहिजे आहेत.याचे कारण धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट होऊ नये,ही कॉंग्रेसची इच्छा आहे.तसेच भाजप आणि शिवसेना युती झाली नाही तर आघाडीला फार मोठा फायदा होऊ शकतो.आता आंबेडकर काय उत्तर देतात यावर आघाडीची समीकरणे अवलंबून आहेत.

Previous articleकॅांग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षांना ७ जागा सोडणार ?
Next articleलोकायुक्त कायदा करुन जनतेची दिशाभूल : मलिक