धारावीला नविन शहराप्रमाणे विकसित करण्यास काँग्रेसचे प्राधान्य

धारावीला नविन शहराप्रमाणे विकसित करण्यास काँग्रेसचे प्राधान्य

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबईच्या सध्याच्या असणा-या सुविधांवर कोणताही ताण न टाकता धारावीला नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भूमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी मांडली.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान ५०० स्क्वेअर फुटाचे घर देम्याची घोषणा केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर धारावी परिसरात पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर भूमिका मांडली. आगाडी सरकारच्या काळात धारावी पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची योजनाही तयार करण्यात  आली मात्र त्याचे श्रेय काँग्रेस राष्ट्रवादीला मिळेल या भितीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना भाजपकडून या प्रकल्पात अडथळे निर्माण केले गेले. आजही सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाच्या नावाखाली युतीकडून दिशाभूल करण्याचे धोरण राबविण्यात येत असल्याची टीका गायकवाड यांनी केली.

Previous articleदेशातील जनता दिल्‍लीच्‍या तख्‍तावर पुन्‍हा भगवा फडकवणार  
Next articleराजेंद्र गावीतांनी डहाणू तालुका पिंजून काढला