भाजपाच्या पराभवाची सुरुवात विदर्भातून : जयंत पाटील

भाजपाच्या पराभवाची सुरुवात विदर्भातून : जयंत पाटील

मुंबई नगरी टीम

मुंबई: भाजपाच्या पराभवाची सुरुवात विदर्भातील नागपुर मधून झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर बसवलेली पकड आज उध्वस्त झाली असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

नागपूर जिल्हा परिषदेचा आज निकाल लागला असून महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. त्यानंतर बोलताना जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप निवडणूक घेण्यास टाळत होता. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक पुढे जात होती. मात्र आज निवडणूक झाली असून ज्या नागपूर जिल्हयात भाजपचे दिग्गज नेते आहेत त्याच जिल्हयात भाजपाला पराभव पत्करावा लागला असल्याचेही पाटील म्हणाले.नागपुरकरांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर नाराजी व्यक्त केली असून याची दखल महाराष्ट्र घेईल असेही पाटील यांनी सांगितले.

Previous articleसमाजसुधारकांच्या विचारानुसार वंचित घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविणार
Next articleनेहरु व कॉंग्रेसचा आरक्षणाला विरोध होता : प्रविण दरेकर