पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक

संग्रहित छायाचित्र

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतांना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे,अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून राज्यातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेतली.यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.तर दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतांना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे,अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी मुक्यमंत्र्यांचे कौतुक केले.

Previous articleशरद पवारांना शेतकरी,मजूर,लोककलावंतांची उपासमार का दिसली नाही ?
Next articleकोरोना आणि मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा