फडणवीस गरजले ! दादागिरी कुणाचीही असो,उत्तर द्यायला भाजपाचा कार्यकर्ता समर्थ

मुंबई नगरी टीम

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर काँग्रेसने काढलेल्या मोर्चानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सागर बंगल्यावर धाव घेतल्यानंतर फडणवीस यांनी काँग्रेसला डिवचले आहे.भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज केवळ आपली शक्ती दाखविली नाही,तर कोण किती पाण्यात आहे, हे सुद्धा दाखवून दिले असे सांगून फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.तर प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गनिमी कावा करत सागरवर धडक मारली असता काँग्रेसचा हा डाव भाजपा कार्यकर्त्यांनी उधळून लावला.भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, आमदार राजहंस सिंह, आमदार मनीषा चौधरी, आमदार राम कदम, यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी सागर निवासस्थानी एकत्रित येवून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सामोरे गेले.त्यांनतर फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करीत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज केवळ आपली शक्ती दाखविली नाही,तर कोण किती पाण्यात आहे, हे सुद्धा दाखवून दिले असे यावेळी फडणवीस म्हणाले.

Previous articleप्रसाद लाड यांनी आव्हान देताच गनिमी काव्याने अतुल लोंढेंनी गाठला फडणवीसांचा बंगला
Next articleदिलासा : ‘या’ महामंडळाची कर्जमर्यादा २५ हजारावरून १ लाखा पर्यंत वाढवली