मोठी बातमी : ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय आज राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिकेच्या सुनावणीवेळी राज्य सरकारने समर्पित आयोगाने ओबीसीप्रवर्गाबाबतचा अहवाल सादर केला आहे.त्याची सुनावणी येत्या १९ जुलै रोजी होणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा गेल्या आठवड्यात केली होती.या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी राज्यातील ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारकडे केली होती.शिवाय दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिकेच्या सुनावणीवेळी राज्य सरकारने समर्पित आयोगाने ओबीसीप्रवर्गाबाबतचा अहवाल सादर केला आहे.त्याची सुनावणी येत्या १९ जुलै रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.या निवडणूका स्थगित करण्यात आल्याने या क्षेत्रात आचारसंहिता लागू राहणार नाही असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणुका स्थगित झालेल्या नगरपरिषदांची जिल्हा व वर्गनिहाय नावे:

अ वर्ग : जळगाव- भुसावळ. पुणे- बारामती. सोलापूर- बार्शी. जालना- जालना. बीड- बीड आणि उस्मानाबाद- उस्मानाबाद.

ब वर्ग: नाशिक- मनमाड, सिन्नर व येवला. धुळे- दोंडाईचा वरवाडे व शिरपूर वरवाडे. नंदुरबार- शहादा. जळगाव- अमळनेर व चाळीसगाव. अहमदनगर- कोपरगाव, संगमनेर व श्रीरामपूर. पुणे- चाकण व दौंड. सातारा- कराड व फलटण. सांगली- इस्लामपूर व विटा. सोलापूर- अक्कलकोट, पंढरपूर व अकलूज. कोल्हापूर- जयसिंगपूर. औरंगाबाद- कन्नड व पैठण. बीड- अंबेजोगाई, माजलगाव व परळी- वैजनाथ. लातूर- अहमदपूर. अमरावती- अंजनगाव.

क वर्ग: नाशिक- चांदवड, नांदगाव, सटाणा व भगूर. जळगाव- वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा व यावल. अहमदनगर- जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता व राहुरी. पुणे- राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड व शिरूर. सातारा- म्हसवड, रहिमतपूर व वाई. सांगली- आष्टा, तासगांव व पलूस. सोलापूर- मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा व सांगोला. कोल्हापूर- गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड व वडगांव. औरंगाबाद- गंगापूर व खुलताबाद. जालना- अंबड, भोकरदन व परतूर. बीड- गेवराई व किल्ले धारूर. उस्मानाबाद- भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परांडा व तुळजापूर. लातूर- निलंगा व औसा. अमरावती- दर्यापूर. बुलढाणा- देऊळगावराजा.
नगरपंचायती: अहमदनगर- नेवासा. पुणे- मंचर व माळेगाव बुद्रुक. सोलापूर- अनगर.

 

Previous articleमविआच्या निर्णयाला शिंदेंची स्थगिती : आता नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेमधून होणार
Next articleशिंदे सरकार १५ दिवसानंतरही मंत्रिमंडळाविना..महाराष्ट्र अनाथ झाल्याची विरोधकांची टीका