ग्रामीण भागात निवडणुकांचे धुमशान,६०८ ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला मतदान,थेट सरपंचांची निवड होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे तर १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल.संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.तसेच निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील.शासकीय सुट्टीमुळे २७,२८ व ३१ ऑगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २ सप्टेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल.तर मतदान १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १९ सप्टेंबर रोजी होईल.समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखीव असतील.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे-

नंदुरबार: शहादा-७४ व नंदुरबार-७५.धुळे: शिरपूर-३३.जळगाव: चोपडा-११ व यावल- २. बुलढाणा: जळगाव (जामोद)- १,संग्रामपूर- १, नांदुरा- १, चिखली-३ व लोणार-२. अकोला: अकोट-७ व बाळापूर-१. वाशीम: कारंजा-४. अमरावती: धारणी-१, तिवसा-४,अमरावती-१ व चांदुर रेल्वे-१.यवतमाळ: बाभुळगाव-२, कळंब-२,यवतमाळ-३,महागाव-१, आर्णी-४,घाटंजी-६,केळापूर-२५,राळेगाव-११, मोरगाव-११ व झरी जामणी-८.नांदेड: माहूर-२४,किनवट-४७, अर्धापूर-१, मुदखेड- ३, नायगाव (खैरगाव)-४, लोहा-५,कंधार-४, मुखेड-५,व देगलूर-१. हिंगोली: (औंढा नागनाथ)-६. परभणी: जिंतूर-१ व पालम-४. नाशिक: कळवण-२२, दिंडोरी-५० व नाशिक-१७. पुणे: जुन्नर-३८, आंबेगाव-१८,खेड-५ व भोर-२. अहमदनगर: अकोले- ४५. लातूर: अहमदपूर-१. सातारा: वाई- १ व सातारा-८. व कोल्हापूर: कागल- १. एकूण: ६०८

Previous articleजनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त
Next articleदेवेंद्र फडणवीसांचे विश्वासू चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती