एमपीएससी परीक्षेतील रॅकेटप्रकरणी विरोधकांचा सभात्याग

एमपीएससी परीक्षेतील रॅकेटप्रकरणी विरोधकांचा सभात्याग

मुंबई :  राज्यातील एमपीएससी परीक्षेत डमी लोकं बसवण्याचे फार मोठे रॅकेट असून याबाबतचा स्थगन प्रस्ताव मांडला गेला परंतु सरकारने हा स्थगन प्रस्ताव फेटाळला त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करत सभात्याग केल्याची माहिती विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी दिली.

लाखो तरुण एमपीएससीची परीक्षा देत असतात. गोरगरीब घरातील मुलं जवळजवळ दरवर्षी ८ ते १० लाख परीक्षा देत असतात. या परिक्षेमध्ये काही लोकं डमी उमेदवार बसवत आहेत. त्या डमी उमेदवाराच्या माध्यमातून पास होवून शासकीय सेवेत दाखल होतात. हे २०१५-१६पासून घडत असणारी प्रक्रिया योगेश जाधव नावाच्या तरुणाने उघडकीस आणली. योगेश जाधव या विद्यार्थ्यांने याबाबत अडीच हजार मेल पंतप्रधान मोदी यांना पाठवले आहेत. याची दखल महाराष्ट्र सरकार घेत नव्हते. २०१५ दरम्यान सुरु झालेली या प्रक्रियेनंतर एफआयआर १६ जुन २०१६ ला दाखल करण्यात आला. त्याच्यावर आता एसआयटी करावी लागली. आजही महाराष्ट्रात २०० डमी बसणारे उमेदवार मोकळे फिरत आहेत. एसआयटीच्या म्हणण्यानुसार १६ जणांना अटक केलेली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांमध्ये फार मोठा असंतोष या सरकारबद्दल निर्माण झाला आहे.

जे लोक वाममार्गाने डमी उमेदवार बसवून पास होवून सरकारी सेवेत आहेत अशांची संख्या जवळपास हजार दीड हजाराच्या घरात आहे आणि २०० लोकं असे आहेत जे डमी म्हणून बसण्याचे काम करत आहेत. या आकडयामध्ये वाढही होवू शकते असेही पाटील म्हणाले.

हे प्रकरण बाहेर काढणाऱ्या योगेश जाधव याच्यावर प्राणघातक हल्लाही करण्यात आला आहे. आता नांदेडच्या पोलिसांनी त्याला संरक्षण दिले आहे. असे असताना सरकार एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शक करत नाही. एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शक व्हाव्यात, बायोमॅट्रीक पध्दतीने व्हाव्यात अशा मागण्या तरुण करत आहेत. याकडे सरकारचे लक्ष नाही. डमी उमेदवार आहेत त्यांना अटक करण्यात येत नाही. काल पाच-सहा जणांना अटक झाली. हे असंच सत्र सुरु राहिलं तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब घरातील मुलांना एमपीएससीच्या परीक्षेला बसण्याची इच्छा राहिल का? हाच खरा प्रश्न आहे.

म्हणून आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. यावर सरकारने चर्चा करावी अशी आमची मागणी होती. निवेदन करावे असेही आम्ही सांगितले परंतु आमचा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि सर्वच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.

Previous articleखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित
Next articleआमदार आसिफ शेख यांना हत्येची धमकी देणारे अजून मोकाट कसे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here