मनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज

मनोज कोटक यांच्यासारखा प्रतिनिधी दिल्लीत जाणे ही मुंबईची गरज

मुंबई नगरी टीम

मुंबई :  ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या रूपाने आम्ही शहरी भागाचा विकास आणि नियोजन या विषयातील तज्ञ उमेदवार आम्ही  म्हणून दि,ला असून अशी व्यक्ती दिल्लीत गेल्यास त्याचा आपल्या मुंबईला निश्चित फायदा होईल, असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

शेलार आज मनोज कोटक यांच्या जनसंवाद यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुलूंड रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. कोटक यांचा जनसंपर्क अपाट असून त्याची प्रचिती आज आली ते पाहता कोटक यांचा विजय निश्चित आहे. फक्त कोटकच नव्हे तर मुंबईतील सर्वच्या सर्व सहा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.या वेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleराजेंद्र गावीतांनी डहाणू तालुका पिंजून काढला
Next articleराज ठाकरेंची भाषणे म्हणजे करमणूक