अखेर ‘त्या’ पोलीस निरीक्षकाचे निलंबन,विभागीय चौकशीही करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे दोन अल्पवयीन विद्यार्थीनींचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याची घटना घडली आहे.या घटनेतील पोलीस अधिकारी संजय सानप यांना निलंबित करण्यात आले असून,त्यांनी विभागीय चौकशी केली जाईल,अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थीनींचे इम्रान कुरेशी याने अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन आणि निकाह करून गेल्या दोन वर्षापासून लैंगिक शोषण करीत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना भाजपचे सदस्य नितेश राणे यांनी उपस्थित करून श्रीरामपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली.त्यावर उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस यांनी श्रीरामपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निलंबित करण्यात आले आहे असल्याचे सांगून, त्यांची विभागीय चौकशी केली जाईल,अशी घोषणा केली.तसेच त्यांचे या घटनेतील इम्रान कुरेशी यांच्याशी काही संबंध आहेत का? याची चौकशी केली जाईल.यामध्ये तथ्य आढळल्यास विशेष कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट केले.

Previous articleसात हजार पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू,आणखी सात हजार पोलिसांची भरती करणार
Next articleआमदारांच्या धक्काबुक्कीनंतर सुप्रिया सुळेंनी केली भाजपच्या मोठ्या नेत्याकडे तक्रार..काय म्हणाल्या ?