सात हजार पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू,आणखी सात हजार पोलिसांची भरती करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना दिली.

राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे.मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. तसेच एका अधिकाऱ्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Previous articleविधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांचा राडा;महेश शिंदे आणि अमोल मिटकरी भिडले
Next articleअखेर ‘त्या’ पोलीस निरीक्षकाचे निलंबन,विभागीय चौकशीही करणार