दुष्काळप्रश्नी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दुष्काळप्रश्नी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

सोलापूर , सातारा , अहमदनगर  आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळी गावांना शरद पवारांनी भेटी देवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर शरद पवार यांनी आज  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्तांच्या समस्या  मांडल्या.पिण्याच्या पाण्याच्या समस्याबद्दल सांगताना पिण्याचे पाणी हे पुरेसे नियमित वेळेवर मिळत नसून कमी अधिक प्रमाणात त्याचबरोबर अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिले. टँकरसाठी पाणी भरताना वीजेची समस्यासुद्धा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. बीड जिल्ह्यामध्ये भेट दिली. त्यावेळी येथील चारा छावणी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. छावण्या सुरू झाल्या तरी चारा न मिळाल्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर असल्यामुळे व्याजाचा भुर्दंड बसत असल्यामुळे जनावरांना चारा देण्याची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे छावण्या बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सगळ्या समस्यांचे गांभीर्य निदर्शनास आणून देत त्यांची देयके वेळेवर दिली जातील असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

प्रति जनावर ९० रुपये इतके चारा छावणी चालवण्यासाठी असणारे अनुदान अपुरे असल्याचे देखील शरद पवारांनी निदर्शनास आणले. ते आता शंभर रुपये प्रति जनावर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.केंद्र शासनाने अन्नसुरक्षा कायदा लागू केल्यानंतर सुद्धा दुष्काळी भागातील जनतेला रेशन कार्डवर अन्नधान्य मिळत नसल्याची तक्रार शरद पवार यांनी केली. त्यावेळेस साधारणतः बीपीएल अंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे शासनातर्फे सांगण्यात आले मात्र दुष्काळी परिस्थितीमध्ये बीपीएल, एपीएल आणि सर्वांनाच यांना अत्यल्प दरात आणि त्यावरील असलेले घटक असतील त्यांना परवडेल असे दरामध्ये धान्य सरसकट देण्यात यावे ही विनंती देखील पवारांनी केली.या बैठकीत प्रति जनावर रुपये शंभर येथे चारा छावण्या अनुदान केल्याचं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणि त्यामध्ये १२० रुपयेपर्यंत वाढ करण्याच्या दृष्टीने निश्चित लक्ष देईल असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

बीड जिल्ह्यामध्ये धनगर समाजातील प्रतिनिधींनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणले की, शेळ्या-मेंढ्यांचा सुद्धा जनावरांच्या छावणीत प्रमाणे विचार करण्यात यावा ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणली. या गोष्टीकडे देखील लक्ष पुरवू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार राणा जगजितसिंह, आमदार राजेश टोपे आदींसह दुष्काळी भागातील काही प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous articleगुलाल उधळायला बारामतीला जाणार
Next articleचारा छावण्यातील जनावरांच्या अनुदानात वाढ :पाटील