केशरी रेशनकार्ड असणा-यांना गहू ८ तर तांदूळ १२ रुपये किलोने मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील  केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यांना ८ रुपये प्रती किलो गहू आणि १२ रुपये प्रती किलो तांदूळ अशा दरात धान्य मिळणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पत्र लिहून संबंधित मंत्रालयाला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंती देखील केली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या ३ कोटी ८ लाख एपीएल शिधापत्रिकाधारकांना याचा फायदा होईल.  त्यासाठी सुमारे २५० कोटी खर्च येणार असून मे आणि जून या महिन्यासाठी हे धान्य दिले जाईल. सध्या जे धान्य केंद्र सरकारकडून मिळते त्या व्यतिरिक्त १ लाख ५४ हजार २२० मेट्रिक टन धान्याची मागणी यासाठी करण्यात आली आहे.  नैसर्गिक आपत्तीमध्ये किमान आधारभूत किंमतीच्या दराने धान्य देण्याबाबत केंद्राचे जे धोरण आहे त्याला अनुसरुनच सवलतीच्या दरात धान्य मिळावे अशी मागणी पंतप्रधानांना करण्यात आली आहे.

Previous articleमारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची चौकशी करा
Next articleमुलीचा जीव वाचविल्याचे मिळाले बक्षिस..आणि ती रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस