मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारने आज तीन वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून,लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र बियाणे महामंडळ, अकोला येथे करण्यात आली आहे.
परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांची बदली लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त एस टी टाकसाळे यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,परभणी या पदावर करण्यात आली आहे.