मुंबई नगरी टीम
पुणे । पेट्रोल-डिझेल,स्वयंपाकाचा गॅस,खाद्यतेल अशा सर्वच जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडर आणि टू व्हिलर गाडीचे श्राद्ध घालत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.कोरोनाने वाचलो अन,महागाईने मेलो, अशा शब्दात चाकणकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
आज राज्यभरात गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.#मोदी_है_तो_महंगाई_है #कोरोनाने_वाचलो_अन_महागाई_ने_मेलो#वसई_विरार #धुळे #वाशी #नेरूळ@NCPspeaks @Jayant_R_Patil @supriya_sule pic.twitter.com/WoPrgCrIhn
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 13, 2021
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दराने शंभरी पार केली आहे.या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.त्यातच स्वयंपाकाचा गॅस,खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले.देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्र सरकारने महागाईचे सुल्तानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे.पंतप्रधान मोदींनी सत्तेत येताना जनतेला महागाईपासून मुक्तीचे,अच्छे दिन च स्वप्न दाखवले.देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला. मात्र पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागले आहे.अशी टीका चाकणकर यांनी केली.केंद्रातील अकार्यक्षम सरकारचा आणि वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.
पुणे शहरात शहराध्यक्ष प्रशांत जगताप,विरोधी पक्ष नेत्या दिपालीताई धुमाळ,माजी उपमहापौर दिलीप बराटे, महिला शहराध्यक्ष मृणालिणीताई वाणी,नगरसेवक सचिन दोडके, युवक अध्यक्ष महेश हांडे, भावना पाटील, पुनम पाटील, अनिता पवार ,श्वेता होनराव व महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गॅस सिलिंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध घालत निषेध नोंदविला.कोरोनाने वाचलो अन,महागाईने मेलो,असा टोला चाकणकर यांनी केंद्र सरकारला यावेळी लगावला.