फडणवीसजी आता तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय : नवाब मलिकांचा टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादीने खरपूस समाचार घेतला आहे.फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे ? असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली.मात्र,यासोबतच केंद्राने 50 टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी,अशी मागणी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.राज्य सरकारच्या या मागणीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधत,सर्वच जर केंद्राने करायचे तर राज्यात आम्ही माशा मारायच्या अन् मिळालेले आरक्षणही घालवायचे असे किती दिवस चालणार ? अशोक चव्हाणांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकते यासंदर्भात विचार केला पाहिजे.असा सवाल फडणवीसांनी केला होता.फडणवीसांच्या या सवालाचा खरपूस समाचार राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी घेतला आहे.आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू.तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या.गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा!असा सल्लाही मलिक यांनी भाजपला दिला आहे.

Previous articleचंद्रकांत पाटलांना मानसिक उपचारांची गरज ; अशोक चव्हाणांचा पलटवार
Next articleये पब्लिक है, सब जानती है! देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधींना पत्र