मुंबई नगरी टीम
मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे इंजिन मजबूत आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसच्या बंद पडलेल्या इंजिनाची चिंता करावी.असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना लगावला आहे.
डब्बे बदलून चालणार नाही तर दशाचे इंजिन बदलावे असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते त्यास उत्तर देताना आठवले यांनी काँग्रेस च्या बंद पडलेल्या इंजिनाची चिंता करा असा सल्ला पटोले यांना दिला आहे.देशाचे इंजिन मजबूत आहे. देशाचे इंजिन बदलणे येड्या गबाळ्याचे काम नाही.डब्बे बदलता येतात मात्र इंजिन बदलता येत नाही.इंजिन बदलण्याची कल्पना खुळी आहे. मोदींच्या रूपाने भाजप एनडीएला लाभलेले इंजिन मजबूत आणि वेगवान आहे. मोदींच्या नेतृत्वात देशाची वेगवान प्रगती होत आहे.असे आठवले यांनी म्हटले आहे.