जयंत पाटील यांनी केला टप्प्यात कार्यक्रम,पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई । आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच… हे जयंत पाटील यांचे वाक्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारचे कोरोना काळातील कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौतुकावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी टप्प्यातील ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये योगी सरकारने अभूतपूर्व काम केले आहे.कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने चांगले काम केले आहे अशी स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली त्यावर ‘उत्तरप्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली. अशा परिस्थितीत उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगली हाताळली असे म्हटले जात असेल तर महाराष्ट्राचे किती कौतुक व्हायला हवे याचा विचार मी करतोय !’ असे म्हणत जयंत पाटील यांनी मोदींना टोला लगावला आहे.

Previous articleनाना सकाळी एक तर दुपारी दुसरेच बोलतात आणि संध्याकाळी विड्रॉ होतात
Next articleछगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट,महत्वाच्या विषयांवर झाली चर्चा