दोन वर्षानंतर भाजपने विरोधी पक्षाचे काम करायला सुरूवात केली ही चांगली गोष्ट

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.

भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.भाजपने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. आता राज्यातील जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडायला सुरुवात करतील अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

Previous articleनाना पटोलेंनी केला केंद्र सरकारवर गंभीर आरोप..काय म्हणाले पटोले ?
Next articleभाजप नेत्याला स्थायी समितीतून काढण्यासाठी महापालिकेने खर्च केले तब्बल १ कोटी