येत्या निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेसला आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच

मुंबई नगरी टीम

मुंबई । उत्तर प्रदेश,पंजाब,गोवा,उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसला असतानाही येत्या २०२४ च्या विधानसभेत निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील आणि पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच असेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चर्चेत आले होते.नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याचे स्पष्ट झाले असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज एक ट्विट करीत येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असा दावा केल्याने पटोले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.उत्तर प्रदेश,पंजाब,गोवा,उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले असतानाही पटोले यांच्या आजच्या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Previous articleसर्वसामान्यांचा भ्रमनिरास करणारा बिन आकड्यांचा अर्थसंकल्प
Next article“दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या” ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान