राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून माझे नाव वगळा,राजू शेट्टीची राज्यपालांकडे मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून राज्य सरकारने शिफारस केलेल्या १२ राज्यपाल नियुक्त जागांच्या यादीत आपले नाव वगळण्यात यावे अशी मागणी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवंद्र भुयार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याने त्यांना पक्षातून काढून थेट महाविकास आघाडीशी काडीमोड घेतलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.१२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्यासाठी राष्ट्रवादीकडून राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.या यादीतील आपले नाव वगळण्यात यावे अशी मागणी यावेळी राजूी शेट्टी यांनी राज्यपालांकडे केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीशी फारकत घेतल्यानंतर त्याच सरकारच्या शिफारसीवरून आमदारकी घेणे हे आमच्या नैतिकतेत बसत नाही, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.यावेळी राज्यपाल महोदयांसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर विस्तृत चर्चा झाली.

Previous articleवीज टंचाई असली तरी कोणत्याही परिस्थितीत राज्यात भारनियमन होऊ देणार नाही
Next articleमुख्यमंत्री राज्य सरकारच्या कारभारात लक्ष घालत नसल्याने प्रश्न चिघळले