‘मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन’च्या नादात माझे फोन टॅपिंग;खडसेंचा फडणवीसांवर निशाणा

मुंबई नगरी टीम

जळगाव । देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना खासदार संजय राऊत,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन बेकायदेशीररित्या टॅप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून,आता या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.फडणवीसांकडून मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन,या नादात माझे फोन टॅपिंग करण्यात आले,अशी टीका एकनाथ खडसे यांनी फडवीसांवर केली आहे.

देवेंद्र फडणवीस सरकराच्या काळात फोन टॅप झाल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करून याची चौकशीची मागणी केली आहे.या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येवून त्यांचा जवाब नोंदविण्यात आला आहे.देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन,या नादात माझे फोन टॅपिंग करण्यात आले, अशा शब्दात खडसे यांनी फडवीसांवर निशाणा साधला आहे.६७ दिवस एकनाथ खडसे यांचा फोन टॅप झाल्याचे सांगण्यात येते. यावरून खडसे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधत, ६७ दिवस माझा फोन टॅपिंग होणे ही बाब गभीर असून,मला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे.याबाबत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा विचार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.

Previous articleभाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? जयंत पाटलांचा रोखठोक सवाल
Next articleमाझ्या चौकशीमागे महाविकास आघाडीचा छळवाद व सूडभावना; प्रविण दरेकरांचा आरोप