फडणवीस पुन्हा कधीही सत्तेत येऊ शकणार नाही ‘ हाच खरा धोका; काँग्रेसचा टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशावर ७०० वर्ष मुस्लिमांनी राज्य केले तर १५० वर्ष इंग्रजांनी राज्य केले. या राजवटीत हिंदूंना काही धोका नव्हता आणि आजही नाही. परंतु विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांकडून हिंदूंना धोका असल्याची जी आवई उठवली जात आहे त्यात ‘मी पुन्हा कधीही सत्तेत येऊ शकणार नाही’ हा खरा धोका त्यांच्यासाठी आहे, असा टोला काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावसा आहे.

देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाचा समाचार घेताना अतुल लोंढे म्हणाले की, सनातनी म्हणता, धर्म धोक्यात आहे असेही म्हणता परंतु वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्र भाजपाची पुन्हा सत्ता येत नाही तर देशातील सत्ता हिंदूंना भीती दाखवल्याशिवाय कायम राहू शकत नाही. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांना वाटते की, मी पुन्हा येईन, पण हिंदूंची मते काही भाजपाला मिळत नाहीत आणि हिंदूंच्या मतांशिवाय पुन्हा सत्तेत कसे येणार हीच खरी भिती आहे, असे लोंढे म्हणाले.

Previous articleशरद पवारांनी राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग आवरावी; चंद्रकांतदादांनी केला टप्प्यात कार्यक्रम
Next articleराज्यात लोडशेडिंग होणार ; वाचा : कोणत्या भागांमध्ये जास्त लोडशेडिंग करणार