महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ? पंकजा मुंडे गरजल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ? असा खडा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला आहे. आरक्षण देण्यासाठी सरकारमध्ये इच्छा आणि प्रयत्नांचा अभाव जाणवत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भातील इम्पेरिकल डेटा सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तेथे ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी दिली. यासंदर्भात महाराष्ट्रातील स्थितीबाबत मुंडे यांनी ट्विट केले आहे, त्यांनी त्यात म्हटले आहे की, “महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ? मध्य प्रदेश करू शकते तर आपण का नाही ? इच्छा तिथे मार्ग ! पण इच्छा आणि प्रयत्नांचा अभाव ओबीसींना महाराष्ट्र राज्यात जाणवत आहे “मध्य प्रदेशने इम्पेरिकल डेटावर योग्य काम केले आहे. त्यामुळे तिथले आरक्षण वाचू शकले, पण महाराष्ट्रातील सरकार नाकर्ते आहे. इथले सरकार वेळकाढूपणा करतंय. तारखा मागतंय. ओबीसी आयोग स्थापन करत नाही. केला तर त्यांना निधी देत नाही. तसेच, माझी महाराष्ट्रातील ओबीसी मंत्र्यांना विनंती आहे, आपल्या मंत्रीपदापेक्षा ओबीसींचा विचार करा. खंबीर भूमिका घेऊन हे आरक्षण वाचवा, केंद्रातील भाजप सरकारवर टीका करून उपयोग नाही. केंद्र सरकारकडे लोकसंख्येचा डेटा असतो. इम्पेरिकल डेटा नसतो, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Previous articleओबीसींवर अन्याय ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा
Next articleमहाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली : देवेंद्र फडणवीसांची टीका