विनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा झाला ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताची सरकारने चौकशी सुरु केली आहे. मात्र हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.दोन वाहनांच्यामध्ये जी जागा होती त्या जागेतून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न मेटे यांच्या ड्रायव्हरने केला.आणि त्या नादात मेटे आणि त्यांचे अंगरक्षक गाडीत ज्या बाजूला बसले होते त्या बाजूला जोरात धडक बसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर झालेला अपघाताची सरकारने चौकशी सुरु केली आहे.मात्र याबाबत शासन काय धोरणात्मक निर्णय घेणार आहे, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघात कसा झाला याची माहिती सभागृहात दिली.,शेवटच्या लेनमधून चालणारे अवजड वाहन मधल्या लेनमधून चालत होता.त्यामुळे विनायक मेटे यांच्या वाहन चालकाला ओव्हरटेक करायला जागा मिळत नव्हती.काही काळ त्याने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाहन चालक तिस-या लेनमध्ये गेला. तिस-या लेनमधूनही त्याने ओव्हरटेक करण्याच्या त्याने प्रयत्न केला मात्र, पुढे एक वाहन होते. या दोन वाहनांच्यामध्ये जी जागा होती त्या जागेतून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न मेटे यांच्या चालकाने केला.आणि त्या नादात मेटे आणि त्यांचे अंगरक्षक ज्या बाजूला बसले होते त्या बाजूला जोरात धडक बसल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.या अपघातानंतर मेटे यांच्या वाहन चालकाने जेव्हा ११२ क्रमांकावर मदतीसाठी फोन केला तेव्हा नवी मुंबई पोलीस मदतीसाठी तातडीने  निघाले होते.मात्र अपघाताच्या धक्क्यामुळे वाहन चालक काहीसा गोंधळला आणि त्याला अपघाताचे नक्की ठिकाण सांगता आले नाही. आम्ही  पनवेलजवळ आहोत एवढेच तो सांगू शकला.अशा परिस्थितीत नवी मुंबई पोलिसांनी अपघात स्थळाचा बराच शोध घेतला. त्यानंतर रायगड पोलिसांनाही माहिती दिली.रायगड पोलीसही मदतीसाठी निघाले होते.या दरम्यान एक्स्प्रेस वेचे व्यवस्थापन पाहणा-या आयआरबी कंपनीला अपघाताची माहिती मिळाली.त्यांची मदत लगेच तिथे पोहोचली, पण दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचेपर्यंत मेटे यांचे निधन झाले होते, अशी माहिती उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी दिली.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आयटीएमएस म्हणजेच इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर करण्याच्या विचारात सरकार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितेल.तसे झाल्यास एक्स्प्रेस वेवर होत असलेल्या हालचालींवर योग्य पद्धतीने लक्ष ठेवणे सोयीचे होईल.त्याशिवाय ११२ क्रमांकावर जेव्हा कोणताही व्यक्ती मदतीसाठी फोन करेल त्यावेळ तो मोबाईलवरूनच  फोन करेल हे गृहीत धरून थेट त्या व्यक्तीच्या फोनचे लोकेशन पोलिसांना कळेल, अशी व्यवस्था लवकरच करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मेटे यांच्या अपघाताबद्दल त्यांच्या कुटुंबियांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या आहेत.त्यांचे निरसन होण्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी.तसेच मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही दूरध्वनी करुन मेटे यांच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली आहे. मेटेंचा वाहनचालकही सातत्याने जबाब बदलत आहे.या पार्श्वभूमीवर मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातस्थळांचा शोध घेऊन तेथील त्रूटी सुधारण्याचे काम सुरु आहे.त्रुटी दूर केल्यानंतर महामार्गावरची कोंडी व अपघातांची शक्यता कमी होईल,असा विश्वास व्यक्त केला.अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. अपर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिका-यांची नियुक्ती करुन त्यांना पोलिसांच्या प्रतिसाद व बचाव कार्यवाहीतील त्रूटी दूर करुन प्रशासकीय सुधारणा सुचविण्यास सांगण्यात येईल, असे आश्वासनही देतानाच मुंबई-पुणे महामार्ग आठपदरी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

Previous articleबेरोजगारांना प्रत्येक महिना ५ हजार रूपयांचा बेरोजगारी भत्ता सुरु करा
Next articleमुख्यमंत्र्यांनी ‘एकनाथ’च रहावे ‘ऐकनाथ’ होऊ नये; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांना कोपरखळी