मुंबई नगरी टीम
मुंबई । ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली.या घटनेवरून विरोधकांनी सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.तर गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने आक्रमक झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याने यावरून भाजप काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत.फडणवीसांनी बेजबाबदार वक्तव्य करुन आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शन घडवले आहे, असा आरोप केल्याने भाजपने त्याच शब्दात पटोले यांना उत्तर दिले आहे.महाराष्ट्रात लाचार, हतबल आणि निष्क्रीयतेचे सर्वोत्तम उदाहरण तुम्ही आहात.प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची झालेली लाचारी आणि हतबलता लोक बघत आहेत, असा टोला भाजपने पटोले यांना लगावला आहे.
@Dev_Fadnavis
फडणवीस जी, नाना पाटोले स्वाभिमानी आहेत म्हणून तुमच्या शेतकरीविरोधी धोरणाला विरोध करून खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले.
आणि तुम्ही सत्तेसाठी लाचार आहात म्हणूनच ज्या अजित पवारांवर संपूर्ण आयुष्यभर भ्रष्टाचाराचे आरोप केले,… https://t.co/3DZCSeUF5F— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 9, 2024
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली.यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधत गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.तर विरोधकांच्या आरोपाला उत्तर देत,गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असे प्रत्युत्तर गृहमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिले.फडणवीस यांच्या या वक्तव्याचा समाचार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेत,राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असतानाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्याचे काहीच गांभिर्य नाही. “गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील” असे बेजबाबदार वक्तव्य करुन त्यांनी आपल्या लाचारी व हतबलतेचे दर्शनच घडवले आहे. फडणवीस यांना माणूस व कुत्रा याच्यातील फरकही कळत नाही का ? महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य राहिले नाही. भाजपा सरकारमुळे महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात पहिल्या नंबरवर आहे असे सुनावले आहे.
नाना पटोले तुम्हाला @Dev_Fadnavis जींवर टीका करण्याचा अधिकार नाही, कारण तुमचं मविआ सरकार असताना त्यावेळचे गृहमंत्री काय करत होते? त्यांना तुरुंगात जावं लागलं, १०० कोटी वसुली, ॲंटलिया बाँब प्लॅंट प्रकरण, वाझे की लादेन, मनसुख हिरेन प्रकरण महाराष्ट्रातील जनता अजूनही विसरलेली नाही.…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 9, 2024
पटोले यांच्या या आरोपवर भाजपने त्यांच भाषेत पटोले यांना उत्तर दिले आहे.नाना पटोले तुम्हाला फडणवीस जींवर टीका करण्याचा अधिकार नाही, कारण तुमचं मविआ सरकार असताना त्यावेळचे गृहमंत्री काय करत होते? त्यांना तुरुंगात जावं लागलं, १०० कोटी वसुली, ॲंटलिया बाँब प्लॅंट प्रकरण, वाझे की लादेन, मनसुख हिरेन प्रकरण महाराष्ट्रातील जनता अजूनही विसरलेली नाही.आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे सक्षम आणि कर्तव्यदक्ष गृहमंत्री आहेत. कुत्रा आणि माणूस याचा फरक त्यांना कळतो पण तुम्हाला फडणवीसद्वेषाचा कावीळ झाल्यामुळे तुम्हाला तो फरक कळणार नाही.महाराष्ट्रात लाचार, हतबल आणि निष्क्रीयतेचं सर्वोत्तम उदाहरण तुम्ही आहात. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची झालेली लाचारी आणि हतबलता लोक बघत आहेत. बाकी तुमच्या अकार्यक्षमतेबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनीच अनेकवेळा दिल्लीत जाऊन सांगितलंय. देवेंद्रजींवर टीका करण्यापूर्वी स्वतःची कारकीर्द तपासा, म्हणजे कळेल असा टोला भाजपने लगावला.
भाजपच्या या आरोपाला काँग्रेसने उत्तर दिले,फडणवीसजी, नाना पाटोले स्वाभिमानी आहेत म्हणून तुमच्या शेतकरीविरोधी धोरणाला विरोध करून खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले. आणि तुम्ही सत्तेसाठी लाचार आहात म्हणूनच ज्या अजित पवारांवर संपूर्ण आयुष्यभर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून दादा-दादा करत खुर्च्या उबवत बसला आहात. तुम्ही लाचार आहात म्हणूनच मुख्यमंत्री पद दिले नाही तरी उपमुख्यमंत्री बनून बसला आहात.तुम्ही अकार्यक्षम आणि हतबल आहात म्हणूनच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणा-या आमदार गणपत गायकवाडला पक्षातून निलंबीत करू शकत नाहीत. तुम्ही निष्क्रीय आहात म्हणूनच दादर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणा-या आमदार सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करू शकला नाहीत. तुम्ही सत्तेचे लालची आहात म्हणूनच वेषांतर करून रात्रभर आमदार फोडत फिरत होतात अशा शब्दात काँग्रेस भाजपवर हल्लाबोल केला आहे.