दिल्लीच्या तक्तापुढे महाराष्ट्र कधीही झुकणार नाही : सुप्रिया सुळेंचा टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्रावर प्रहार केला आहे.दिल्लीच्या तक्तापुढे महाराष्ट्र कधीही झुकणार नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावरून केंद्रावर निशाणा साधला असतानाच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्रावर प्रहार केला आहे.दिल्लीच्या तक्तापुढे कधीही महाराष्ट्र झुकणार अशा शब्दात सुळे यांनी केंद्राला टोला लगावला आहे.माझ्या बहिणी जिजाऊ,सावित्रीच्या लेकी आहेत.त्या कधीही घाबरणार नाहीत.या प्रसंगातून त्या यशस्वीपणे बाहेर पडतील असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही महिलेवर अन्याय केला नाही.मोगलांनी महिलांवर अन्याय केला असे सांगतानाच हा आमच्या कुटुंबियांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न आहे.हे दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली.शरद पवार,अजित पवार आणि मी राजकारणात आहे. आम्ही नेहमीच माणूसकी पाहिली आहे त्यानंतर राजकारण केले आहे.काल ज्या धाडी पडल्या त्यावेळी दादा ( अजित पवार ) अस्वस्थ झाले होते.मग मी त्यांची समजूत काढली.या प्रसंगातून माझ्या बहिणी सुखरूप बाहेर पडतील.सत्याचाच विजय होईल असेही यावेळी सुळे म्हणाल्या.ज्यांनी धाडी टाकल्या त्यांना काहीच मिळाले नाही तर धाडी टाकणारे म्हणतील आम्ही उगाचच धाडी टाकल्या अलेही त्या पुढे म्हणाल्या.

Previous articleनिमंत्रण पत्रिकेत नारायण राणेंचे तिसरे नाव ; व्यक्त केली नाराजी
Next article‘या’ निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मिळणार ; सरकारचा निर्णय