लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत विजयाची सुनामी निर्माण करू

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत विजयाची सुनामी निर्माण करू

मुंबई नगरी टीम

मुंबई  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे पाठबळ आणि राज्यातील भाजपा महायुती सरकारचे गेल्या पाच वर्षांतील काम याच्या जोरावर मतदारांशी प्रभावी संवाद साधून लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही विजयाची सुनामी निर्माण करू शकतो, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच बूथरचनेच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत यश मिळवू, असे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र, प्रदेश बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. बैठकीचा समारोप करताना मा. मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनम महाजन, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, मुंबई भाजपा अध्यक्ष व शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, प्रदेश सरचिटणीस व ओबीसी कल्याणमंत्री डॉ. संजय कुटे, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. अतुल भातखळकर व आ. डॉ. रामदास आंबटकर उपस्थित होते. भाजपाचे खासदार, आमदार,प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष बैठकीस उपस्थित होते.

Previous articleमुख्यमंत्री सहाय्यता निधीतून  ५६ हजार रुग्णांना मदत
Next articleपुढे काय करायचे  ते माझ्यात  आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ठरलंय