मराठा समाजाच्या एकजुटीचा व दृढ निश्चयाचा विजय

मराठा समाजाच्या एकजुटीचा व दृढ निश्चयाचा विजय

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय,मागासवर्गीय आयोगाची मेहनत आणि मराठा समाजाची एकजूट यामुळेच मराठी तरुणांना आता विकासाचा एक मार्ग खुला झाला आहे.मराठा विद्यार्थी आणि युवकांना अनेक संधी आता उपलब्ध झाल्या आहेत. गरीब शेतकऱ्याचा मुलगा चांगला शिकेल, चांगली नोकरी मिळवेल हे काम भाजप – शिवेसना युती सरकारने केले ते कोणीच विसरणार नाही, मराठा समाजाच्या एकजुटीचा, दृढ निश्चयाचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रीया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

Previous articleमराठा समाजाच्या एकजुटीचा विजय
Next articleशासनाने एक मोठी लढाई जिंकली : मुख्यमंत्री