मुख्यमंत्री म्हणाले… आम्ही वैभव पिचडांना आधी पकडले नंतर मधुकर पिचडांना

मुख्यमंत्री म्हणाले… आम्ही वैभव पिचडांना आधी पकडले नंतर मधुकर पिचडांना

मुंबई नगरी टीम

मुंबई : नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे नेते संदीप नाईक आज भाजपात आले आहेत. त्यामुळे त्यांना गणेश नाईक यांचा आशीर्वाद नक्की मिळणार आहे असे सांगून गणेश नाईक हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी करून, आम्हीही हुशार आहोत. आम्ही अगोदर राधाकृष्ण पाटील यांना पक्षात घेतले नाही तर सुजय विखेंना आधी घेतले. आम्ही वैभव पिचड यांना आधी पकडले तर मधुकर पिचड आपोआप सापडलेच. विजयसिंह दादांचेही तेच केले, रणजितसिंह पाटील यांना भाजपमध्ये घेतले आहे, अशी मिश्किल टिपणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षप्रवेश सोहळ्यात केली.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपकडून धाक दाखवून पक्षात घेतले जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. याला मुख्यमंत्र्यांनी  प्रत्युत्तर दिले मुख्यमंत्री म्हणाले, धाक दाखवून पक्षात घेण्याचे भाजपचे दिवस आता राहिलेले नाहीत. एक दिवस होता की भाजप लोकांच्या मागे फिरायचा पण आज समाजातील चांगले नेते भाजपमध्ये येत आहेत, भाजप ही काय धर्मशाळा नाही की कुणीही उठावं आणि पक्षात यावं. जनतेचा पक्ष जरूर आहे. पण पक्ष प्रवेश देताना नेत्यांचे कार्य, कर्तृत्व, समाजातील त्यांचं स्थान आम्ही विचार करीत आहोत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपा प्रवेशावर मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हीही हुशार , आम्ही अगोदर राधाकृष्ण पाटील यांना पक्षात घेतले नाही तर सुजय विखेंना आधी घेतले. आम्ही वैभव पिचड यांना आधी पकडले तर मधुकर पिचड आपोआप सापडलेच. विजयसिंह दादांचेही तेच केले, रणजितसिंह पाटील यांना भाजपमध्ये घेतले आहे, अशी मिश्किल टिपणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

Previous articleभाजपात  काँग्रेस राष्ट्रवादीची “मेगाभरती”
Next articleपाच वर्ष जनतेला फसवले त्याचा हिशोब द्या : विजय वडेट्टीवार