शिवस्वराज्य यात्रेत घुमणार नव्या “स्वराज्याचा नवा लढा”  

शिवस्वराज्य यात्रेत घुमणार नव्या “स्वराज्याचा नवा लढा”

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात येत्या ६ ऑगस्टला होणार असून शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरपासून सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्टला राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे.शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार असून, हाच पक्षाचा जाहीरनामा महाराष्ट्रातील लोकांपर्यंत घेवून जाणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.राज्याची आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रयतेच्या हाताला काहीच लागलेले नाही. वीजदरवाढ, टोलमुक्त महाराष्ट्र या घोषणाच राहिल्या आहेत असा आरोपही पाटील यांनी केला.

या यात्रेत बेरोजगार युवकांची नोंदणी केली जाणार आहे. त्यांच्या भविष्याचा विचार यातून सक्षमपणे केला जाणार आहे.युवकांच्या हाताला काम देणे, राज्यातील सगळ्या थरातील व्यवस्थेला मदत करण्याची भूमिका असणार आहे असेही पाटील यांनी सांगितले. ही शिवस्वराज्य यात्रा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. घोर फसवणूक, युवकांची निराशा यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि रयतेच्या हितासाठी ही शिवस्वराज्य यात्रा असणार आहे.महाराष्ट्रात, देशात लोकशाहीने चालतो. सरंजामशाही शाहीचा काळ कधीच संपला आहे. परंतु संरजामशाहीला अपवाद होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. त्याकाळातही या युगपुरुषाने रयतेचे राज्य आणले. शेकडो वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान कोट्यावधी लोकांच्या हदयात आदराचे आहे.सर्व घटकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने शिवस्वराज्याची सनद देवून आम्ही काय देवू इच्छितो यासाठी ही सनद घेवून जाणार आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या  महाजनादेश यात्रेला तुफान प्रतिसाद
Next articleनाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्विकारले