स्टँपपेपरवर लिहून देतो.. हे सरकार पाच वर्षे टिकणार

स्टँपपेपरवर लिहून देतो.. हे सरकार पाच वर्षे टिकणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : आज महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.उपमुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा होती मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट करीत राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षे टिकणार आहे असा विश्वास व्यक्त केला.

 राज्यात नव्याने स्थापन होणारे महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षे टिकणार यामध्ये माझ्या मनात कसलीही शंका नाही. शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे  सरकार पाच वर्षे टिकणार आहे. वाटल तरं मी स्टँपपेपरवर लिहून देतो असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री होणार आहे यासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती मात्र आपण नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले. मी नाराज असल्याचे दिसतो का असा सवाल करीत आज होणा-या शपथविधी सोहळ्याला आपली बहिण सुप्रिया सुळे यांच्या सोबत उपस्थित राहणार असल्याचेही अजितदादांनी स्पष्ट केले.

Previous articleनव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री केवळ राष्ट्रवादीचाच;अध्यक्षपद काँग्रेसकडे
Next articleशिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार