भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिस दलाचा ज्यापद्धतीने गैरवापर झाला त्याची चौकशी व्हावी : शरद पवार

मुंबई नगरी टीम
मुंबई : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे दिला तो केंद्राचा अधिकार आहे. परंतु भीमा कोरेगाव किंवा एल्गार याची चौकशी व्हावी ही आमची मागणी नाही.तर पोलिस दलाचा ज्यापद्धतीने गैरवापर झाला आहे त्याची चौकशी करायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते.भीमा कोरेगाव प्रकरणाचा चौकशी करण्याचा अधिकार राज्य सरकारलाही आहे.यामध्ये पोलिस दलातील पुणे पोलिस यांनी जो तपास केला.त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलाच्या लौकिकाला धक्का बसला आहे.त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या महाराष्ट्र पोलिस आणि पुणे पोलिसांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.भीमा कोरेगाव, एल्गार परिषदेची चर्चा राज्यात सध्या जोरदार सुरु आहे. भीमा – कोरेगाव हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोकं स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात.या स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जावून आले आहेत. त्या काळात जे युद्द झाले.त्यावेळी पेशव्यांचा पराभव झाला होता. ब्रिटिशांच्या बाजुने काही घटक होते हे यावरुन स्पष्ट होते. इथले स्थानिक ग्रामस्थ इथे येणा-या लोकांना पाण्याची व्यवस्था करत होती.त्यावेळी कोणतीही कटुता नव्हती. मात्र आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, एकबोटे यांनी फिरुन वेगळं वातावरण निर्माण केले.वडूज गावात छत्रपती संभाजी महाराजांचे रक्षण करणा-या व्यक्तीची समाधी होती.

आता भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी सुरु आहे.चौकशी आयोग नेमण्यात आला आहे.त्यामुळे वस्तुस्थिती समोर येईल त्यावर आज भाष्य करता येणार नाही असेही पवार यांनी सांगितले.कोरेगाव आणि एल्गारचा संबंध नव्हता. पुरोगामी विचाराच्या लोकांनी सहभागी होत ही एल्गार परिषद घेतली होती. पी. बी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद होणार होती परंतु प्रकृतीमुळे ते आले नाहीत. त्या परिषदेत भाषणे झाली. पोलिस अहवाल सादर केला गेला. त्यात सगळे सांगितले आहे.आज प्रश्न निर्माण झाला आहे तो त्याच्याशी संबंध नसलेल्या लोकांचा आहे. त्याठिकाणी हजर नव्हते. त्यांच्यावर खटले भरण्यात आले आहेत.सुधीर ढवळे यांनी कविता वाचन केले म्हणून त्यांना अटक केली. नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे वाचन केले होते. त्या कवितेत राज्यातील शहरात गावात उपेक्षित वर्गावर झालेले अत्याचार यावर तीव्र भावना व्यक्त केली होती असे पवार यांनी सांगितले.

शेवटी त्या कवितेत या शहरा शहराला आग लावत जा असा सारांश होता.नामदेव ढसाळ यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.त्यामुळे या कवितेचा आधार घेऊन दोन – दोन वर्ष तुरुंगात टाकायचे ही गोष्ट योग्य नाही. यांच्यावरील अन्याय कसा दुर करता येईल. न्यायालयात काय होतेय हे पाहणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयात त्यांना जामीन मिळाला नाही.जी माहिती राज्याने ठेवली. पुरावे असे तयार केले की जामीन त्यांना मिळाला नाही.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दाखल्याचे वाचन शरद पवारांनी यावेळी केले.चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. आणि आमचीही तीच मागणी आहे. यामागे कोण आहे त्याची चौकशी व्हावी.त्यासाठी एसआयटी नेमून यामध्ये चांगले अधिकारी घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. जे काही पुरावे देण्यात आले त्यातील सत्य बाहेर येईल शिवाय तुरुंगात का डांबले व ज्यांनी केले आहे सत्य बाहेर येईल असेही पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी बैठक घेतली.केंद्र सरकारने का तत्परता का दाखवली. केंद्र सरकारला याची माहिती कुणी दिली.यामध्ये अधिकारी कोण आहेत का याची माहिती चौकशीत पुढे येईल असेही शरद पवार म्हणाले.या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते. की साहित्यिकांना डांबले आहे. त्यांचे कार्य आक्रमक आहे म्हणून मी देशद्रोही म्हणणार नाही.एल्गार परिषद झाल्यावर शपथ घेण्यात आली. वरीष्ठ पोलिस निरीक्षक विश्राम धाम पुणे यांनी रिपोर्ट दिला आहे.जी शपथ घेण्यात आली त्या शपथेचे वाचन शरद पवारांनी यावेळी केले. या शपथेमध्ये संविधानाचा उल्लेख आहे असे असताना तुरुंगात डांबले आहे. ते उपस्थित नव्हते त्यांनाही डांबले आहे. सत्तेचा कसा गैरवापर केला हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे हे प्रकरण मला लोकांच्या समोर आणायचं आहे. राज्य सरकार काय तपास करायचा ते करेल मी त्यात पडणार नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.पोलिस दलाची अवस्था आज काय आहे. मात्र सत्तेचा गैरवापर पोलिसांना वापरुन होतो ही चिंताजनक बाब आहे. म्हणून मी हे प्रकरण मांडत आहे असेही पवार म्हणाले.

Previous articleभीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करणार
Next articleपरळीतील गुंडगिरीवरुन पंकजाताई मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा