कर्जवसुली स्थगितीसाठी सल्ला नको तर निर्देश द्या: अजित पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई: देशात असलेल्या सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्हं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातील बँका व वित्तीय संस्थांनी  कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी,असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत.तर त्यांना रिझर्ब्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश देणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री  अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले देशव्यापी लॉकडाऊन आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता रिझर्व्हं बँकेकडून देशातील बँका व वित्तीय संस्थांनी  कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी असा आदेश देणे अपेक्षित होते असे सांगून,राष्ट्रीय,खाजगी,सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांनी त्यांची कर्जवसुली तीन महिने थांबवण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी वित्तमंत्री अजित पवार यांनी केली आहे. रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केल्याने कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होईल. बँकांचा सीआरआर कमी करून ३ टक्क्यांवर आणल्याने बाजारात पावणे चार लाख कोटी रूपये उपलब्ध होतील, याचा बँकांना फायदा होईल असेही पवार यांनी स्पष्ट केले

Previous articleमत्स्य व्यावसायिकांना दिलासा; आता मासे वाहतूक करता येणार
Next articleभाजप दररोज २० लाख लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचविणार