राज्यात कामगार ब्यूरोची स्थापना करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : संकटासोबत संधीही निर्माण होते. कोरोनामुळे राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्याचा देश-विदेशातील गुंतवणुकदारांना फायदा घ्यावा असे आवाहन करतानाच मनुष्यबळाची टंचाई भासू नये यासाठी कामगार ब्यूरोची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

मनुष्यबळाची टंचाई भासू नये यासाठी कामगार ब्यूरोची स्थापना करण्यात येणार आहे. याद्वारे उद्योगांना लागणारे कुशल, अकुशल मनुष्यबळ अवघ्या सात दिवसांत पुरविण्याचे नियोजन उद्योग विभागाने केले आहे असल्याचे देसाई यांनी सांगितले. उद्योग सुरू झाल्यांतर पुढील एक दोन वर्षांत इतर विभागांचे परवाने घेण्याची मुभा दिली जाईल.गुंतवणूकदारांनी या सर्व संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी ऑल इंडिया असोशिएशन ऑफ इंडस्ट्रीज व वर्ल्ड ट्रेड सेंटरच्यावतीने आयोजित वेबिनार दरम्यान केले.नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी एमआयडीसी औद्योगिक शेड उभे करून देणार आहे. विविध परवान्याऐवजी महापरवाना घेऊन उद्योग सुरू करताय येईल.याशिवाय एमआयडीसी बाहेरील जमीन अधिगृहित करून उद्योग सुरू करण्यास चालना दिली जाईल.विदेशी गुंतवणुकदारांसाठी एमआयडीसीने राज्याच्या विविध भागांत सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. यामध्ये पाणी, वीज रस्ते आदी पायाभूत सुविधा सज्ज ठेवल्या आहेत. गुंतवणूक करार केल्यानंतर थेट उत्पादन सुरू करण्यासाठी एमआय़डीसी स्वखर्चाने औद्योगिक शेड उभे करणार आहेत. या ठिकाणी प्ले अँड प्लगद्वारे थेट उद्योग सुरू करता येईल.

विदेशी गुंतवणुकदारांच्या सल्लागारांसोबत उद्योग विभागाचे अधिकारी चर्चा करत आहेत. या शिवाय विविध देशाच्या वाणिज्यदुतांसोबत चर्चा केली जाईल.राज्यात उद्योग वाढीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने खुले धोरण स्वीकारले आहे. विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना दिला जाईल.

Previous articleपालखी सोहळा होणार की नाही याचा निर्णय ३० मे नंतर
Next articleपहिल्याच दिवशी राज्यातील ५ हजार ४३४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री