यश- अपयशाने खचून जायचे नसते आणि वाहतही जायचे नसते : सुप्रिया सुळेंचा भाजपचा टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठ्या प्रमाणात यश आल्यामुळे आमच्यावर आता जबाबदारी वाढली आहे.यामुळे राज्यातील जनतेने आम्हाला जो आशीर्वाद दिला आहे,त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादाला सार्थ करून दाखवू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

यश- अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. त्यातून खचून जायचे नसते. आणि वाहतही जाऊ नये.त्यामुळे आम्ही यशाकडे एक जबाबदारी म्हणून पाहतो.आम्हाला शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार मिळाले आहेत त्यामुळे या संस्काराचे भान ठेवूनच आम्ही त्याच्याकडे पाहतो असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

Previous articleअमर,अकबर,अँथनीची महाविकास आघाडी हिट! रॉबर्ट शेठचा दणदणीत पराभव
Next articleविधान परिषदेचा निकाल म्हणजे सरकारच्या कामावर लोकांनी दाखवलेला विश्वास