मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “वर्क फ्रॅाम-मंत्रालय” कधी करणार ? भाजपचा सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई । तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा,बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.आता या वरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही सवाल उपस्थित करून डिवचले आहे.

तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्रीपवार यांनी आज सकाळपासूनच मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा,बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्री पवार यांचे सकाळपासून वादळ परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे.आता यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारले आहेत.मुख्यमंत्री ठाकरे “वर्क फ्रॅाम-मंत्रालय” कधी करणार ? कोकण,मुंबईवर वादळ आले,सोसाट्याचा वारा,मुसळधार पाऊस आला,घरे पडली,झाडे कोसळली,रस्त्यांवर पाणी… त्यातच कोरोनाचे संकट,मुख्यमंत्री घरात बसलेत.उपमुख्यमंत्री पवार यांनीमंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पहाणी तरी केली पण..मुख्यमंत्री कधी दिलासा देणार ? असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याची घटना, अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो, तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते.इथे लोकांना वर्क फ्रॅाम होम करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वःताच इतक मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार ? महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिळविला. मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत.जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवा अशा शब्दात उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

Previous articleतौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे सकाळपासूनच “वर्क फ्रॅाम-मंत्रालय”
Next articleतोक्ते चक्रीवादळामुळे ६ जणांचा मृत्यू,९ जण जखमी;२ हजार ५४२ घरांची पडझड