विरोधी पक्षनेते वैफल्यग्रस्त : उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

मुंबई नगरी टीम

सिंधुदूर्ग । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधाला आहे.विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही असे टीकास्त्र सोडतानाच पंतप्रधान संवेदनशील असून महाराष्ट्राला मदत करतील,असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा दौरा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज केला.तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे आम्हीदेखील पंतप्रधानांना मोठ्या मदतीची अपेक्षा असल्याचे कळवले आहे. पंतप्रधान संवेदनशील असून योग्य ती मदत करतील असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला.मुख्यमंत्र्यांचा या दो-यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली होती त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले.हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.कोकणाने शिवसेनेला भरभरुन दिले आहे, आता शिवसेना कोकणातील जनतेला काय देणार अशी टीका फडणवीस यांनी केली होती त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,आम्ही काय देणार आहेत त्यांची काळजी तुम्ही करु नका. कोकण आणि शिवसेनेचे नात घट्ट आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यात कमी जास्त काही होणार नाही.

तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या,संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.तौक्ते चक्रीवादळाने जिल्हयातील 5 तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले. यात अधिक नुकसान राजापूर व रत्नागिरी तालुक्यात आहे. जिल्हयात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामा योग्य पध्दतीने करुन नेमेकेपणाने आकडेवारी सह प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.या वेळी जिल्हयातील कोव्हीड परिस्थितीचाही आढावा याच बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना चांगली उपचार सुविधा आपण देत आहोत. सोबतच रुग्णसंख्या प्रामुख्याने मृत्यूचे प्रमाण कमी होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.

दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येईल असे म्हटले जात असले तरी योग्य ती खबरदारी आणि उपाय योजल्याने आपण ती येणारच नाही यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करु असे मुख्यमंत्री म्हणाले.जिल्हयात झालेल्या नुकसनीबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी सादरीकरण केले. या चक्रीवादळात जिल्हयात २ जणांचा मृत्यू झाला असून ८ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत पशुधनाची संख्या ११ आहे.जिल्हयात १७ घरे पूर्णत: बाधित झाली असून अंशत: बाधित घरांची संख्या ६७६६ आहे. यात सर्वाधित दापोलीत २२३५ आहेत. रत्नागिरी तालुक्यात १०८४ तर राजपूरातील ८९१ घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गोठयांची जिल्हयातील ३७० इतकी आहे.वादळात वाऱ्यामुळे १०४२ झाले पडली. यात सर्वाधित ७९२ झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या २५० इतकी आहे.चक्रीवादळात ५९ दुकाने व टपऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या ५६ आहे. या सर्व शाळा राजापूर आहेत.

चक्रीवादळाने मोठया प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे ११०० शेतकऱ्यांचे या साधारण २५०० हेक्टर इतके नुकसान झाले. यातील ३४३० शेतकऱ्यांच्या ८१०.३० हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे.चक्रीवादळाचा सर्वाधित फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. यात १२३९ गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत ११७९ गावांचा पुरवठा आता पूर्ववत झाला आहे.बाधित उपकेंद्राची संख्या ५५ व फिडरची संख्या २०६ आहे. याची दुरुस्ती देखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबाचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे ४८५ खांब बाधित झाले असून यापैकी १२५ पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या १२३३ इतकी आहे. यातील १३३ खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.जिल्हयातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी ३ बोटी पूर्णत: तर ६५ बोटींचे अशंत: नुकसान झाले. ७१ जाळयांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान ९० लाख रुपयांपर्यंत आहे.या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या ३०१ मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे १ कोटी ९८ लाख ८४ हजार पेक्षा जास्त अधिक नुकसान आहे.बैठकीसाठी व्यासपीठ उभारले असले तरी तेथे न जात मुख्यमंत्री ठाकरे यांनी समोरील डी मध्ये खुर्च्या लावण्यास सांगितले व साधेपणाने सादरीकरण व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्वागतासाठी हार – बुके देखील नको अशा सूचना दिलेल्या असल्याने साध्या पध्दतीनेचे पूर्ण बैठक पार पडली.

Previous articleकोरोना काळात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण ? मोदींना ९० टक्के मतं
Next articleमुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली: प्रविण दरेकरांचा हल्लाबोल