परमबीर सिंग यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुखांच्या विरोधात कटकारस्थान

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे.परमबीर सिंग यांना वाचवण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांना आश्वासित केले.त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आरोपपत्रांमध्ये परमवीरसिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही.त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून करण्यात असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जे आरोपपत्र दाखल केले आहे.त्यामध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी ५ लाख रुपये माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी दिले होते असे सायबर एक्स्पर्टने सांगितले असल्याचे मलिक यांनी सांगितले.राष्ट्रीय तपास यत्रणेने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली नाही.त्यांना आरोपी करण्यात आले नाही.खंडणीसाठी हे सगळं कटकारस्थान सचिन वाझे याने केले आहे.त्यात पूर्ण सत्य आहे असे आमचं मत नाही. बरचसं काही यातून बाहेर येऊ शकत होतं परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणेने तसा काही तपास केला नाही.काही लोकांना वाचवण्यासाठी काम केले आहे. परमवीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान दिल्याचा गंभीर आरोपही मलिक यांनी यावेळी केला.

Previous articleमहापालिका जिल्हा परिषदा,पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा “मास्टर प्लॅन”
Next articleठाकरे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय