अभिनेत्री कंगना राणावत ओवरडोस झाल्यासारखी काहीही बोलते

मुंबई नगरी टीम

मुंबई । वादग्रस्त विधान करणा-या आणि कोट्यवधी भारतीयांचा आणि स्वातंत्र्यसेनानी यांचा अपमान करणा-या अभिनेत्री कंगना राणावत हीचा केंद्र सरकारने पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असे वादग्रस्त विधान अभिनेत्री कंगना राणावत हिने केले होते यावर मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. १८५७ पासून स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली. लाखो स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी यांनी या देशात एक मोठा लढा निर्माण केल्याने ब्रिटिशांनी स्वतंत्र भारत करण्याची घोषणा केली आणि १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. एवढं बलिदान असताना कंगना राणावत ही अभिनेत्री ओवरडोस झाल्यासारखी काहीही बोलते अशी जोरदार टीकाही मलिक यांनी केली.

Previous articleकाँग्रेस कार्यकर्त्यांचे चेहरे उत्साही व आनंदी तर भाजपाचे रागीट व भयग्रस्त दिसतात
Next articleमला विषाची नाही तर अमृताची वेल लावायचीय,अजून लढाई संपलेली नाही !