लसीचे दोन डोस आणि कोरोना चाचणी केल्यावरच अधिवेशनाला प्रवेश मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक २४ डिसेंबर रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

अधिवेशन कालावधीत लसीकरण पूर्ण म्हणजे ‌कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनाच प्रवेश तसेच आरटीपीसीआर चाचणी देखील अनिवार्य करण्यात आले आहे. दर आठवड्याला ही चाचणी होणार आहे. मंत्री, राज्यमंत्री यांच्या सोबत केवळ एकाच अधिकाऱ्याला प्रवेश दिला जाणार असून विधानमंडळ सदस्यांचे स्वीय, सहायक, वाहनचालकांसाठी विधान भवनाच्या बाहेरील प्रांगणात स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. या काळात खासगी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. या बैठकीत कामकाजाचा दिनक्रम, लक्षवेधी, प्रश्नोत्तरे आदींबाबत चर्चा झाली.

Previous articleखूशखबर : ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रूपयांनी वाढ
Next article‘तुम्ही संधीचे सोनं कराल’…. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास